यूपीएशिवाय काँग्रेस म्हणजे शरीराशिवाय आत्मा  – सिब्बल

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यूपीए (संयुक्त पुरोगामी आघाडी) संदर्भात विधान केले होते. ज्यामध्ये यूपीए नसल्याचे म्हटले होते. ममता बॅनर्जींनी यूपीएबाबत केलेल्या या वक्तव्यावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी प्रतिक्रिया दिली असून यूपीएशिवाय काँग्रेसला काही अर्थ नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

कपिल सिब्बल यांनी ट्विट करून लिहिले की, यूपीएशिवाय काँग्रेस म्हणजे शरीर ज्यामध्ये आत्मा नाही. विरोधकांची एकजूट दाखवण्याची वेळ आली आहे. या ट्विटद्वारे कपिल सिब्बल यांनी ममता बॅनर्जी यांना यूपीएमध्ये काँग्रेसचे महत्त्व काय आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

ममता बॅनर्जी यांनी काल मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये  तिसरी आघाडी स्थापनेबाबत चर्चा झाली. त्याचवेळी या बैठकीनंतर ममता बॅनर्जी यांना शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष बनवायचे आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाच्या उत्तरात ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की यूपीए? आता युपीए नाही का? यूपीए म्हणजे काय? आम्हाला एक मजबूत पर्याय हवा आहे. या वक्तव्याद्वारे ममता यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला होता.

एके काळी तृणमूल काँग्रेस एकेकाळी यूपीएचा भाग होती हे विशेष. पण आता ममता यांनी काँग्रेस पक्षापासून दुरावले आहेत. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीतही ममता यांनी काँग्रेससोबत युती केली नाही. काँग्रेससह डाव्या पक्षांनी तृणमूल आणि भाजपविरुद्ध ही निवडणूक लढवली. या निवडणुकीत ममता यांच्या पक्षाचा विजय झाला होता.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

मोठी बातमी! मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचं अखेर निलंबन

Next Post

PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारे पैसे ‘या’ छोट्या चुका केल्याने अडकतात

Related Posts
Budget 2024 Live Updates |  25 कोटी लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढण्यात मोदी सरकारला यश आले 

Budget 2024 Live Updates |  25 कोटी लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढण्यात मोदी सरकारला यश आले 

Budget 2024 Live Updates, Finance Minister Nirmala Sitharaman Speech: देशभरात येत्या तीन महिन्यांत सार्वत्रिक निवडणुका होणार असून त्याआधीचा…
Read More
RSS | 'तीन-चार मुलं जन्माला घातल्यानेच देश विकसित होईल', RSS चे लोकसंख्येवर अजब विधान

RSS | ‘तीन-चार मुलं जन्माला घातल्यानेच देश विकसित होईल’, RSS चे लोकसंख्येवर अजब विधान

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आरएसएस (RSS) आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. मोहन भागवत (Mohan Bhagwat) आणि इंद्रेश कुमार यांच्या वक्तव्यामुळे…
Read More
rane

या लोकांना काय हक्क आहे आमची बदनामी करण्याचा?, दिशा सालियनच्या आईचा थेट सवाल 

 मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सालियान हिने आत्महत्या केली नसून तिची बलात्कारानंतर हत्या झाली होती.…
Read More