Crime: ३ मुलांची आई ५ मुले असलेल्या दीराच्या पडली प्रेमात, दोघेही घरातून झाले फरार आणि मग…

राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यात अनैतिक संबंधातून वहिनी आणि दीर घरातून फरार झाले आणि त्यांनी आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, बांसवाडा येथे 3 जून रोजी आमजा गावातील जंगलात एक महिला आणि पुरूषाचा मृतदेह लटकलेला आढळून आला होता. दोघांचेही मृतदेह काही दिवसांपासून लटकलेले असल्याने काळे पडले होते आणि त्यातून वासही येत होता. गावातील लोकांनी मृतदेह पाहून पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह खाली काढले. हे मृतदेह कालू (40) आणि बबली (39) यांचे होते.

पोलिसांनी सांगितलं की, प्राथमिक चौकशीतून समोर आलं की, दोघेही नात्याने दीर आणि वहिनी लागत होते. काही दिवसांआधी दोघेही घरातून गायब झाले होते. त्यानंतर बबलीच्या पतीने पोलिसात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यासोबतच आपला भाऊ कालू विरोधातही तक्रार दाखल केली होती. पोलीस दोघांचाही शोध घेत होते. अशात त्यांचे मृतदेह आढळून आले. दोघांचेही प्रेम संबंध असण्याची शक्यता आहे.

चौकशीतून समोर आलं की, बबलीला तीन मुले आहेत. त्यातील एकाचं लग्न झालं आहे. तेच दीर कालू याला पाच मुलं आहेत. यातील 4 मुली आहेत आणि एक मुलगा आहे. यातील 3 मुलींची लग्ने झाली आहेत. पोलिसांनी कायदेशीर कारवाई करत मृतदेहांचं पोस्टमार्टम केलं. त्यानंतर मृतदेह कुटुंबियांना दिले. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.