रूपया इतका खाली घसरत चाललाय, तो काही दिवसांनी उत्खननातच सापडेल की काय अशी भीती वाटतेय

मुंबई – देशातील वाढत्या महागाई (Inflation) वर आणि सतत घसरत चाललेल्या रुपयावर राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर (Adv. Yashomati Thakur) प्रतिक्रिया व्यक्त करीत केंद्रातील मोदी सरकारवर (Modi Government) निशाणा साधला आहे. त्यांनी “मोदी, कुठे नेऊन ठेवलाय ‘रुपया माझा’? आता सामान्य माणुस विचारतोय!” “रूपया इतका खाली घसरत चाललाय, तो काही दिवसांनी उत्खननातच सापडेल की काय अशी भीती वाटतेय” अशा आशयाचे सूचक ट्विट करीत सर्वसामान्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

देशात पेट्रोल-डिझेलसह (Petrol-Diesel) अगदी जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठी भाववाढ झाली आहे. त्यातच रुपयाचे अवमूल्यन म्हणजे सामान्य माणसाचे कंबरडे मोडण्यासारखे आहे. आधीच लॉकडाउननंतर सामान्य माणसाचे जगणे असह्य झाले असताना, आता केंद्रातील सरकारने महागाईचा आणखी एक धक्का दिला आहे. सामान्य माणसाने जगायचे तरी कसे असा उपरोधिक प्रश्न ठाकूर यांनी विचारला आहे.