Devendra Fadnavis | लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला अपेक्षित यश मिळवला आले नाही. ४८ पैकी केवळ ७ जागा जिंकल्याने भाजपाची नाचक्की झाली आहे. महाराष्ट्रातील भाजपाचा पराभव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिव्हारी लागला असून त्यांनी पराभवाची जबाबदारी स्विकारत मला सरकारमधून मोकळ करावं, अशी मी विंनती पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचे सांगितले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मागणी केंद्रीय नेत्यांकडून मान्य केली जाते का? याकडे लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली आहे. या चर्चेमध्ये उपमुख्यमंत्रीपद सोडण्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर मुक्कामी जात आहेत. या मुक्कामी दिल्लीतील कोणत्या नेत्यांच्या भेटीगाठी करतात आणि काय निर्णय होते याकडे सुद्धा लक्ष असेल.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :