Crime News | देशाच्या ईशान्य सीमेवरुन बांग्लादेशी नागरिक आणि रोहिंग्यांची मानवतस्करी करणाऱ्या मुख्य सुत्रधारांपैकी एक असलेल्या आरोपीला राष्ट्रीय तपास संस्था (National Investigation Agency) अर्थात एनआयए नं काल अटक केली. त्रिपुराचा रहिवासी असलेला जलील मिलाह याला NIA नं ताब्यात घेतलं आहे.
तस्करी करणाऱ्या टोळीचा प्रमुख जीबान रुद्र पाल बरोबर तो काम करत असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. या प्रकरणात यापुर्वी ३३ जणांना अटक करण्यात आली आहे. एनआयएच्या तपासानूसार, भारत-बांगलादेश सीमेवरील काही भागातून दर महिन्याला मोठ्या संख्येने बांगलादेशी नागरिक आणि रोहिंग्यांची भारतात तस्करी (Crime News) होत असल्याचं समोर येत आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप