Devendra Fadnavis | ‘फडणविसांनी महाराष्ट्रात जे सूडाचे दळभद्री राजकारण केले, त्याची किंमत त्यांना मोजावी लागली’

Devendra Fadnavis | महाराष्ट्रातील भाजपाचा पराभव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिव्हारी लागला असून त्यांनी पराभवाची जबाबदारी स्विकारत मला सरकारमधून मोकळ करावं, अशी मी विंनती पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, फडणवीसांची भूमिका जाहीर होताच विरोधकांच्या ते निशाण्यावर आले आहेत.

महाराष्ट्रातील जनतेचा नरेंद्र मोदी आणि अमित शाह या जोडीवर जितका राग नसेल तितका राग देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात जे सूडाचे दळभद्री राजकारण केले, त्याची किंमत लोकसभा निवडणुकीत त्यांना मोजावी लागली. ‘मी पुन्हा येईन’, ‘मी दोन पक्ष फोडून आलो’, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले होते. पण आज त्याच दोन पक्षांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जाहीरपणे अश्रू ढाळण्याची वेळ आणली, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली.

आमच्या मनात देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी कटुता आहे, यासाठी तेच कारणीभूत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात बदल्याचं, सूडाचं राजकारण केले. हे तुमचं फडतूस राजकारण आहे. लोकांनी संधी मिळाल्यावर याचा बदला घेतला. देवेंद्र फडणवीसांनी मराठी माणसांच्या स्वाभिमानाला नख लावण्याचं काम केले. हातातील सत्तेचा वापर चुकीच्या मार्गाने केला. त्यांनी राजकीय कार्यकर्त्यांवर सूड उगवला अशा प्रकारची टीका राऊत यांनी केलीय.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like