Sanjay Raut | लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला अपेक्षित यश मिळवला आले नाही. ४८ पैकी केवळ ७ जागा जिंकल्याने भाजपाची नाचक्की झाली आहे. महाराष्ट्रातील भाजपाचा पराभव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिव्हारी लागला असून त्यांनी पराभवाची जबाबदारी स्विकारत मला सरकारमधून मोकळ करावं, अशी मी विंनती पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचे सांगितले आहे. याबाबत शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर दबाव टाकण्याचा हा डाव आहे.
संजय राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाची शपथ घेऊ द्या आणि मिठाई वाटू द्या. मोदींचे सरकार स्थापन होणार नाही आणि बनले तरी टिकणार नाही, असे मी वारंवार सांगितले आहे. मोदीजी नाटक करतात, ढोंग करतात. कधी हसतात तर कधी रडतात. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मोदीजींचे शिष्य म्हटले जाते आणि महाराष्ट्रातील भाजपच्या दुर्दशेमागे देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र हे सभ्यता आणि संस्कृतीने चालणारे राज्य आहे, मात्र देवेंद्र फडणवीस यांनी या राज्यात विष कालवले असून त्याची किंमत भाजप चुकवत आहे, असे संजय राऊत म्हणाले.
पुढे योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल संजय राऊत म्हणाले की, काही लोक योगीजींना हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही योगीजींना नेहमीच वंदन करत आलो आहोत. त्यांच्या पक्षाचे मुद्दे कोणतेही असोत, आम्ही त्यांचा नेहमीच आदर केला आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :