Sharad Pawar group | भाजपचे 400 पारचे स्वप्न भंगले, हाच मोदींचा पराभव; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून प्रतिक्रिया

Sharad Pawar group | देशाच्या ऐतिहासिक सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल काल ४ जून रोजी जाहीर झाला. भाजपाने या निवडणुकीत विक्रमी मतदान घेऊन तिसऱ्यांदा सत्तेत येऊ, असे म्हटले होते. पण, जनतेने सत्ताधाऱ्यांचा ४०० पार चे स्वप्नभंग केले आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद (Sharad Pawar group) साधताना लगावला.

महेश तपासे म्हणाले की, ४०० पारचा नारा देणाऱ्यांना २५० जागाही मिळाल्या नाहीत. भाजप स्वबळावर सत्तेत येऊ शकणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर भाजपकडून आता मोदी सरकार ऐवजी एनडीए सरकार असा उल्लेख करणे सुरू झाले आहे.

देशातील बेरोजगार तरुण, शेतकरी व संविधान मांणाऱ्या नागरिकांनी भाजपाला त्याची जागा दाखवली आहे. महाराष्ट्रात भाजप ४५ पार म्हणणारे देवेंद्र फडणवीस यांनाच स्वतःचा राजीनामा पुढे करण्याची वेळ आली आहे.

शिवसेना व राष्ट्रवादी फोडून काहीच उपयोग झाला नाही, महाराष्ट्राच्या जनतेने भाजपला पूर्णपणे नाकारले हे लक्षात आल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी खेळी सुरू केली आहे. वास्तविक भाजपाला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा घ्यायचा आहे.

महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपली सत्ता येत नाही हे फडणवीस यांच्या लक्षात आल्यामुळे मीच राजीनामा देतो असे राजीनामा नाट्य फडणवीस यांनी सुरू करून शिंदे व पवार यांच्यावर नैतिक दडपण आणण्याचा डाव टाकला असेही महेश तपासे म्हणाले. विधानसभेच्या निवडणुकीत शिंदे अजित पवार यांच्या उमेदवारांना जागा देण्यापेक्षा स्वबळावर लढावे असा विचार फडणवीस यांना येत असावा असेही तपासे म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like