Uddhav Thackeray | महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन गुरुवारी (२७ जून) सुरू झाले. अधिवेशनाच्या सुरुवातीला शिवसेना-उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित करताना सांगितले की, आजपासून अधिवेशन सुरू होत आहे पण जनता या सरकारला बाय बाय म्हणत आहे. हे सरकार उद्या (२८ जून) अर्थसंकल्प जाहीर करणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी महाराष्ट्रासाठी किती पैसा खर्च केला ते सांगतील अशी आशा आहे.
यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राम मंदिरातून पावसाचे पाणी गळण्याच्या मुद्द्यावरून भाजपला कोंडीत पकडले असून, ही सरकारची गळती आहे, असे ते म्हणाले. राम मंदिरात पाणी टपकत असून पेपरफुटीचा मुद्दाही समोर आला आहे.
Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray says, "Monsoon session (of Maharashtra Assembly) starts today but people are saying 'tata, bye-bye' to this government. Budget will be announced by this government tomorrow. We expect them to tell us how much money they spent on Maharashtra.… pic.twitter.com/TvXclAq5xr
— ANI (@ANI) June 27, 2024
अधिवेशनासाठी विरोधकांनी रणनीती आखली
पावसाळी अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी बुधवारी बैठक बोलावली आणि अधिवेशनात कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली. त्यातून NEET पेपरफुटीचा मुद्दा जोरकसपणे मांडला जाईल, असे मानले जात असून उद्धव ठाकरे यांच्या आजच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट झाले आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप