Virat Kohli | दुसऱ्यांदा टी20 विश्वचषक ट्रॉफी जिंकल्यानंतर भारतीय संघ बार्बाडोसमध्ये जल्लोषात मग्न झाला होता. भारताने टी-20 विश्वचषक 2024 च्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून ही कामगिरी केली. त्यानंतर भारतीय संघाला नवी दिल्लीला परतावे लागले. मात्र निसर्गाच्या कहरामुळे भारतीय संघ अद्याप नवी दिल्लीत पोहोचू शकलेला नाही. वास्तविक, बार्बाडोसची राजधानी ब्रिजटाऊनमध्ये वादळ आले आहे. ज्याचे नाव हरिकेन बेरिल आहे. यामुळे विराट कोहलीसह (Virat Kohli) संपूर्ण टीम त्यांच्या हॉटेलमध्ये अडकली आहे.
Virat Kohli showing Hurricanes to Anushka Sharma on video call at Barbados. ❤️pic.twitter.com/PzZY3RmMMb
— Tanuj Singh (@ImTanujSingh) July 2, 2024
या वादळात कोहलीला पत्नी अनुष्काची आठवण आली
2024 चा टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडिया नवी दिल्लीला रवाना होणार होती, तेव्हा संपूर्ण टीम हॉटेलमध्ये अडकली. बार्बाडोसची राजधानी ब्रिजटाऊनमध्ये बेरिल चक्रीवादळाने कहर केला आहे. यामुळे संपूर्ण भारतीय संघ हॉटेलमध्ये अडकला आहे. या भयानक वादळाच्या स्थितीची कल्पना घेण्यासाठी स्टार फलंदाज विराट कोहलीने व्हिडिओ कॉलवर पत्नी अनुष्का शर्माला बार्बाडोसचे भयानक हवामान दाखवले.
कोहलीचा अनुष्का शर्माला व्हिडिओ कॉल करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ब्रिजटाउनचे सुंदर समुद्रकिनारे लाटांच्या तावडीत कसे आहेत हे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. झाडे जोमाने थरथरत आहेत. विराट कोहली स्वत: या स्थितीत आपली टोपी धरताना दिसत आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप