Rohit Pawar | एकीकडे मुंबईत टी20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाच्या मिरवणुकीची तयारी सुरू असताना, दुसरीकडे भारतीय संघाच्या मिरवणूक बसवरुन राजकारम पेटले आहे. महाराष्ट्रात मिरवणूक काढण्यासाठी गुजरातवरुन बस बोलावल्याने विरोधकांनी राज्य सरकारला घेरले आहे. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
भारतीय संघाला सर्वांनी ताकद दिली, त्यामुळे टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला, त्याचा आम्हाला आनंद आहे. आता, टीम इंडिया वर्ल्डकपसह महाराष्ट्रात,विशेष करुन मुंबईत येत आहे. मग, ही रॅली महाराष्ट्रातील बसमधूनच, मुंबईतील बेस्ट बसमधून काढायला हवी. कारण, मुंबई शहर प्रवासाच्या बाबतीत अत्यंत सुखद आहे, मग मुंबईत वर्ल्डकप येत असेल तर बेस्टच्या बसचा वापर केल्यास आम्हाला आनंद होईल. आम्ही त्यासाठी बीसीसीआयकडे विनंती करू, शेवटी तेच निर्णय घेतील, असे आमदार आणि महाराष्ट्र क्रिकेट संघाचे अध्यक्ष रोहित पवार यांनी म्हटले.
#WATCH | Mumbai: NCP SCP leader Rohit Pawar says, "Our players played well. We won the World Cup. But, if the World Cup is coming to Maharashtra for the victory parade, then 'BEST' (BEST Bus Transport) Bus should be used. As we are emotionally connected with the 'BEST' (BEST Bus… pic.twitter.com/2ZPgkwG5rI
— ANI (@ANI) July 4, 2024
वर्ल्डकप टीमच्या रॅलीसाठी आलेल्या गुजरातच्या बसला आम्ही चांगली पार्कींगची जागा देऊ. पण, बेस्ट बसचा वापर केला पाहिजे. बीसीसीआयने मोठी आणि चांगली बस आणली असेल, पण आमच्या भावना बेस्टसोबत जोडलेल्या आहेत. त्यामुळे, टीम इंडियाच्या रॅलीत बेस्टची बस वापरल्यास आम्हाला अधिक आनंद होईल, असेही रोहित पवार यांनी म्हटले.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप