Chandrashekhar Bawankule | “सरकारमध्ये राहूनही संघटनेचं काम करता येतं”, फडणवीसांच्या राजीनाम्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया

Chandrashekhar Bawankule | महाराष्ट्रातील भाजपाचा पराभव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिव्हारी लागला असून त्यांनी पराभवाची जबाबदारी स्विकारत मला सरकारमधून मोकळ करावं, अशी मी विंनती पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचे सांगितले आहे. देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमधून मोकळं करण्याच्या विनंतीवर राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची प्रतिक्रिया पुढे आली आहे.

“महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीनंतर आज महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. यामध्ये आलेल्या अपयशाचं आम्ही चिंतन केलं आहे. त्या माध्यमातून आता आम्ही पुढे जाणार आहोत. पुढे जाण्यासाठी आम्ही एक रोडमॅप तयार करणार आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी पक्षनेतृत्वानं सरकारमधून मोकळं करण्यासंदर्भात जे विधान केलं. मात्र, त्यांनी त्यांची ती भावना व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस हे नेहमी संघटनेच्या कामावर भर देतात. त्यांची ही भूमिका महत्वाची आहे. मात्र, पूर्णवेळ संघटनेवर काम करण्यासाठी सरकारच्या बाहेर येऊन काम करण्याची आवश्यता नाही. सरकारमध्ये राहूनही संघटनेचं काम करता येतं”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
लोकसभा निवडणुकीनंतर मुंबईत पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रामध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही. किंबहुना आमच्या आपेक्षापेक्षा खूप कमी जागा मिळाल्या. भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलेलं आहे. मुंबईच्या अध्यक्षांनी स्वतः लक्ष घातलं. जो पराभव झाला त्याची सर्व जबाबदारी माझी आहे. सर्व जबाबदारी देवेंद्र फडणवीस स्वीकारत आहे. आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचं आहे. मला सरकारमधून मोकळ करावं, अशी मी विंनती करणार आहे. बाहेर राहिलो तरी मी काम करीन. पण मला आता पूर्णवेळ विधानसभेकडे लक्ष केंद्रीत करायचं आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like