Jayant Patil | महाविकास आघाडीच्या पैकीच्यापैकी जागा निवडून येतील, जयंत पाटलांनी व्यक्त केला विश्वास

Jayant Patil | महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण आहे. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांविषयी लोकांच्या मनात प्रचंड नाराजी आणि महाविकास आघाडीमध्ये एकजुटता आहे. आघाडी एकसंघपणे लढली तर चित्र पलटू शकते आणि महाविकास आघाडीच्या पैकीच्यापैकी जागा निवडून येतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केला.

आज सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ तासगाव येथे जाहीर सभेला जयंत पाटील संबोधित करत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, तासगावचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुमन पाटील या सातत्याने येथील पाण्याचा प्रश्न मांडत आहेत. मी जलसंपदा मंत्री असताना टेंभू योजनेतून या भागात आठ टीएमसी अतिरिक्त पाणी देण्याचा निर्णय घेतला. नदीत पाणीच नाही अशी बतावणी करणारी हुशार लोकं युती सरकारमध्ये होती. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात बराच अभ्यास करून योग्य नियोजन केले. जतच्या उर्वरित भागासाठी सहा टीएमसी पाणी देऊन जत विस्तारित योजनेचे काम सुरू केले. जवळपास १२० गावांना या नियोजनाचा फायदा होणार आहे असे त्यांनी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ramdas Athawale | कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधान बदलले जाणार नाही, रामदास आठवलेंची ग्वाही

Ravindra Dhangekar | आता जनतेला अंधे, मुके आणि बहिरे सरकार नकोय, धंगेकर यांची मोदीं सरकरावर टीका

Devendra Fadnavis | …तुम्ही कफन चोर आहात, देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल