Maharashtra Politics | राज्यात अनेक मतदारसंघात मुस्लीम मतदारांनी अडचणीत आणले महायुतीचे उमेदवार

Maharashtra Politics | नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मुस्लीम समाजाने अनेक ठिकाणी ठरवून भाजपच्या आणि महायुतीच्या विरोधात मतदान केल्याचे दिसून येत आहे. सोलापूर किंवा धुळे असो, पुणे असो संभाजीनगर असो किंवा उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघ असो या आणि आणखी बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडीला मुस्लीम मतदारांनी पसंती दिल्याचे दिसत आहे.

उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी ईशान्य मुंबई मतदारसंघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी भाजपच्या उज्वल निकमांचा पराभव करत मोठा विजय मिळवला. या ठिकाणी उज्वल निकम यांच्यासारखा प्रखर देशभक्त आणि तगडा उमेदवार देवून देखील भाजपच्या पदरी (Maharashtra Politics) निराशा पडली.

धुळ्यात देखील काहीसे असेच चित्र असून या मतदारसंघात मुस्लिमांनी ठरवून भाजपच्या उमेदवाराचा पराभव केल्याचे दिसून येत आहे. संभाजीनगरात शिवसेनेचा उमेदवार निवडून आला असला तरीही मुस्लिम मतदारांनी महायुतीच्या विरोधातच मतदान केल्याचे दिसत आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप