वेदांता वडापावची गाडी नाही, सेनाभवनावरून उचलली मातोश्रीला लावली; फडणवीसांची खोचक टीका

मुंबई: वेदांता प्रकल्पासाठी वर्षभरापूर्वीपासून महाराष्ट्रासह गुजरातही प्रयत्न करत होते. ती काय वडापावची गाडी नाही सेनाभवनावरून उचलली आणि मातोश्रीला लावली, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.

गेल्या काही दिवसापासून शिवसेना (ShivSena) आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावर आज फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. ‘येणाऱ्या काळात शिवसेनेतील ठाकरे गटाला जशास तसे नाही तर व्याजासह उत्तर दिले जाईल असं प्रत्युत्तर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

यावेळी खासदार शरद पवार यांच्यावर बोलताना फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, शरद पवार यांनी जे वक्तव्य केले आहे. वेंदातांबाबत त्यांच्या सारख्या राजकारण्याची किव येते, मोठा फुगा पवारांनी केला आहे, उद्धव ठाकरे यांच्या हातात देऊन त्यांना खेळवलं जात आहे.