लग्न करेल तर ‘याच’ व्यक्तीशी; अलका ताईंनी यांनी घेतली होती शपथ

मुंबई – अलका कुबल (Alka Kubal ) हे मराठी चित्रपट विश्वातील सुपरिचित नाव आहे. माहेरची साडी या सिनेमामुळे त्यांनी स्वताची एक वेगळी ओळख निर्माण केली .त्यासोबतच लेक चालली सासरला, तुझ्यावाचून करमेना, माहेरचा आहेर, दुर्गा आली घरा, काळूबाईच्या नावानं चांगभलं, सुवासिनीची सत्त्वपरीक्षा, अग्निपरीक्षा असे त्यांचे अनेक चित्रपट लोकप्रिय ठरले.

असाच एक सिनेमा करत असताना अलका कबूल यांची ओळख सिनेमेटोग्राफर समीर आठल्ये (SameerAthalye) यांच्याशी झाली. समीर आणि अलका कबूल यांनी चार – पाच सिनेमात एकत्र काम केले. तेव्हाच त्याची जवळीक वाढली. त्या दोघानी कधीच त्यांच्या प्रेमाची कबुली दिली नाही. (Alka Kubal Love story)  किंवा त्या दोघांना कधी त्याची गरज देखील भासली नाही. समीर काही केल्या त्याचे प्रेम व्यक्त करायला तयार नाही हे पाहून अलका कबूल स्वताच समीर याच्याशी बोलल्या की किती दिवस आपण असे फिरत रहायचे आपण लग्न करुयात. या नंतर दोघांनी देखील त्याच्या प्रेमाची कबुली घरी दिली.

अलका कबूल यांच्या घरून त्याच्या लग्नाला थोडासा विरोध झाला. कारण समीर हे चित्रपट व्यवसायातील होते आणि अलका ताई याच्या घरच्याची अपेक्षा होती की अलका यांनी या क्षेत्रातील व्यक्तीशी लग्न करू नये. पण अलका यांनी ठरविले होते लग्न करेल तर फक्त समीरशी नाहीतर नाही. शेवटी अलका ताई याच्या घरच्या लोकानी लग्नाला परवागी दिली आणि आधी साखर पुडा आणि नंतर चार महिन्यानी लग्न असे झाले.

अलका ताई म्हणतात समीर मधील प्रामाणिकपणा मला खूप भावला आमच्या क्षेत्रात फार कमी प्रामाणिक लोक असतात. समीर नक्कीच एक चांगला माणूस आहे. अलका कुबल आणि समीर आठवले यांना दोन मुली असून त्या दोघी देखील उच्च शिक्षित आहेत.