सरकारी योजना: मुलींना ५ वी ते १२ वीपर्यंतचे शिक्षण घेणे सुलभ होण्यासाठी देण्यात येतोय मोफत प्रवास सवलत पास

अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना

योजनेचे स्वरुप:
ग्रामीण भागातील विद्यार्थीनींना शाळेत जाण्यासाठी, त्यांचे शाळेतील गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी, ५ वी ते १२ वीपर्यंतचे शिक्षण घेणे सुलभ होण्यासाठी मोफत प्रवास सवलत पास देण्यात येतो.

योजना कोणासाठी:
• सवलत फक्त ग्रामीण भागातील विद्यार्थीनींसाठी अनुज्ञेय.
• ग्रामीण भागातील स्थानिक ठिकाणी माध्यमिक शिक्षणाची सोय असल्यास दुसऱ्या गावात अथवा शहरात जावून माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना ही सवलत अनुज्ञेय राहणार नाही.

योजनेची कार्यपद्धती:
• शाळेच्या मुख्याध्यापकांनी पात्र विद्यार्थीनींची तपशिलवार पादी राज्य परिवहन महामंडळाच्या आगारप्रमुखांना पाठवावी.
• मुख्याध्यापकांकडून यादी प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थीनीस संबंधित आगार प्रमुखांमार्फत तिमाही पास मोफत उपलब्ध करून देण्यात येतो.
• पुढील तिमाहीचा पास महामंडळाकडून घेण्यासाठी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी दर महिन्यास विद्यार्थीनींची किमान उपस्थिती ७५ टक्के असण्यासंबंधीचे प्रमाणपत्र राज्य परिवहन महामंडळास देणे आवश्यक.

संपर्क: संबंधित  शाळेचे मुख्याध्यापक किंवा महाविद्यालयाचे प्राचार्य.