Chandrashekhar Bawankule | उद्धव ठाकरेंचा वाचाळपणा काही थांबायचं नाव घेत नाही; बावनकुळेंनी पुन्हा म्हटले ‘महानालायक’
Chandrashekhar Bawankule | सोमवारी सोलापुरात झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली होती. यावरूनच बावनकुळे यांनी पलटवार केला आहे.
यासंदर्भात ट्विट करत बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्राचे महानालायक उद्धव ठाकरे यांचा मोदी आणि देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलताना आज पुन्हा तोल गेलाच. उद्धव ठाकरेंनी देवेंद्रजींच्या नावानं कितीही शिव्याशाप दिले तरी जनता जनार्दनाचे आशीर्वाद देवेंद्रजींसोबत आहेत.
खरं तर समर्थ रामदास स्वामींनी मुर्खांची लक्षणं सांगतांना लिहून ठेवलंय.
तोंडाळासीं भांडों नये | वाचाळासीं तंडोंनये |
संतसंग खंडूं नये | अंतर्यामीं ||||\
महाराष्ट्राचे महानालायक उद्धव ठाकरे यांचा आदरणीय मोदीजी आणि देवेंद्रजींबद्दल बोलताना आज पुन्हा तोल गेलाच.
उद्धव ठाकरेंनी देवेंद्रजींच्या नावानं कितीही शिव्याशाप दिले तरी जनता जनार्दनाचे आशीर्वाद देवेंद्रजींसोबत आहेत.
खरं तर समर्थ रामदास स्वामींनी मुर्खांची लक्षणं सांगतांना…
— Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) April 30, 2024
पण उद्धव ठाकरेंचा वाचाळपणा काही थांबायचं नाव घेत नाही. अडीच वर्षे घरात बसून काढली, बोलण्यासाठी एक विकासकामही केलं नाही. मग लोकांसमोर गेल्यावर अशी मुक्ताफळे उधळण्याची वेळ येते. उद्धव ठाकरे हे आता नैराश्याच्या गर्तेत गेले आहेत. त्यांची ही वायफळ बडबड त्यांच्या पक्षातील उमेदवारांना आणि नेत्यांना सुद्धा नकोशी झाली आहे.
उद्धव ठाकरे यांनी आता एक लक्षात ठेवावं की, तुम्ही मोदीजी आणि देवेंद्रजींबद्दल कितीही वायफळ बडबड करा. ४ जून रोजी जनता तुम्हाला तोंड दाखवायलाही जागा ठेवणार नाही, असा घणाघातही त्यांनी यावेळी केला.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
Murlidhar Mohol | मोदींच्या नेतृत्वात भारत बनेल तिसरी मोठी अर्थव्यवस्था, मुरलीधर मोहोळ यांचा विश्वास
Eknath Shinde | ज्या गोष्टीचा खेद वाटायला हवा त्याचा उबाठाला अभिमान वाटतोय