मोदीपूर्व राजवटीत परदेशात भारतीयांना किंमत नव्हती- कोश्यारी

नागपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या आधीच्या राजवटीत परदेशात भारतीयांना किंमत नव्हती. आमच्या परंपरांना लोक नाव ठेवत असत. आता मात्र नरेंद्र मोदींमुळे देशाचा जगात गौरव वाढत आहे, असं राज्यपाल भरतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) म्हणालेत.

मी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) यांचाही कार्यकाळ पाहिला आहे. मात्र पहिल्यांदाच देशासाठी 20 तास काम करणाऱ्या नरेंद्र मोदींमुळे जगात भारताचा गौरव वाढला (India’s glory increased) आहे, अशा शब्दात कोश्यारी यांनी मोदींचं कौतुक केलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापाठीच्या (Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Vidyapath) शतकोत्तर महोत्सावाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते.