मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदेंची केली शिवरायांशी तुलना, विधानाची सर्वत्र चर्चा

मुंबई: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरून गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात राजकारण केले जात आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना शिवाजी महाराजांशी केल्यामुळे टीकेची झोड उठली होती. अशातच आता पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिवरायांबद्दल केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

जसं औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना डांबून ठेवलं होत, पण स्वराज्यासाठी ते बाहेर पडले, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देखील कोणीतरी डांबून ठेवलं होतं, पण महाराष्ट्रासाठी ते बाहेर पडले, असं विधान मंगलप्रभात लोढा यांनी केलं आहे.