Vijay Wadettiwar | लग्नासाठी त्यांना अपेक्षित हुंडा मिळाला नाही म्हणून त्यांनी लग्न मोडलं; आंबेडकरांच्या टिकेला वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर
Vijay Wadettiwar On Prakash Ambedkar : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव पाठवला होता. त्यावर काँग्रेसचा प्रस्ताव म्हणजे वराती मागून घोडं अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली होती. त्यावर आता त्यांना विजय वडेट्टीवार यांनी मिश्किल उत्तर दिले आहे. हुंड्यासाठी जे काही अपेक्षित होतं ते त्यांना मिळालं नाही, त्यामुळे चर्चा न करता त्यांनी लग्न मोडलं, अशा टोला वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी प्रकाश आंबेडकरांना लगावला आहे.
वड्डेटीवार म्हणाले की, “साक्षगंध होण्यापूर्वीच आम्ही त्यांना पसंत केलं होतं. त्यांनी का लग्न मोडलं हे त्यांचं त्यांना माहिती. कदाचित त्यांना हुंड्यामध्ये जे काही अपेक्षित होतं ते न मिळाल्यामुळे त्यांनी लग्न मोडलं असावं. त्यांनी याबाबत चर्चा केली पाहिजे होती.”
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
Har Ghar Modi Parivar Abhiyan | दहा लाख मतदारांपर्यंत पोहोचला ‘मोदींचा नमस्कार’
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार महिला शक्ती !