आरक्षणावर बोललो तर मंत्रिपद जाण्याची भीती; अतुल सावेंच्या वक्तव्याने खळबळ 

Atul Save : राज्यात सध्या विविध समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय वर्तुळात अनेक आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. यातच आता राज्य मागासवर्ग आयोगाकडून ज्या पद्धतीने काम होणे अपेक्षित आहे, त्या पद्धतीने काम होत नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज आहेत, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहनिर्माण तसेच ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी दिली. मात्र त्यानंतर लगेचच अतुल सावे यांनी आपल्या वक्तव्यावर घुमजाव केलं आहे त्याचवेळी. मराठा, ओबीसी आरक्षणावर बोलू नका असे भाजपा मंत्र्यांना वरिष्ठांकडून आदेश असल्याची पुष्टी मंत्री अतुल सावेंनी दिली आहे.

महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार,  मंगळवारी (आज) सकाळी मंत्री अतुल सावे यांनी पुण्यामध्ये बोलताना मुख्यमंत्री राज्य मागासवर्ग आयोगावर नाराज असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर या प्रश्नावर अतुल सावे यांना हटकले असता ते म्हणाले, ‘या प्रश्नावर आम्हाला न बोलण्याच्या सूचना आहेत. त्यामुळेच मी सकाळपासून पत्रकारांना टाळत आहे. हा प्रश्न विचारून तुम्ही माझं मंत्रिपद धोक्यात आणणार आहात का?’ असा प्रतिप्रश्न सावे यांनी माध्यमकर्मींना केला.

मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न चिघळलेला असताना भाजपने आपल्या मंत्र्यांना या प्रश्नांना बोलण्याच्या सूचना केल्याचं अतुल सावे यांच्या वक्तव्यानंतर समोर येत आहे. एकंदरीत वरिष्ठांच्या सूचनांनंतरही आरक्षणावर बोललो तर मंत्रिपद जाण्याची भीती अतुल सावेंनी प्रत्यक्षरित्या बोलून दाखवली.

महत्वाच्या बातम्या-

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजप कोणाला मुख्यमंत्री करणार? शाह म्हणाले….

राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंग यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

CID फेम अभिनेते दिनेश फडणीस यांचे निधन, मुंबईच्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास