राहुल गांधी जी यांच्यामध्ये देवाचं रुप आहे असं वाटतं – ॲड. यशोमती ठाकूर

शेगाव  – मला लोकांनी सांगितलं, राहुल गांधी जी एक निरागस व्यक्ती आहेत, ही व्यक्ती बिल्कुल पाण्यासारखी स्वच्छ आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या अंत:करणात आपण बघितलं तर आपल्याला असं वाटतं हे साक्षात देवाचं रुप आहे, असं वक्तव्य माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी शेगाव येथील विराट सभेत केले.

यावेळी बोलताना ठाकूर पुढे म्हणाल्या कि, राहुलजी कुठल्याही सत्तेसाठी रस्त्यावर चालत नाहीत. त्यांना काहीही पाहिजे आहे असे नाही किंवा त्यांची काही अपेक्षाही नाही. मात्र ते द्वेष भावनेच्या विरोधात, प्रेमाचा संदेश आणि एकात्मतेचा संकल्प घेऊन कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यत भारत जोडण्यासाठी निघालेले आहेत.