Navneet Rana | काही लोक मैदान जिंकण्यासाठी निवडणूक लढवतात, तर काही लोक…; नवनीत राणा यांचा कडूंना टोला

पंतप्रधान मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीला गेलेल्या नवनीत राणा (Navneet Rana) या नुकत्याच महाराष्ट्रात परतल्या. त्यानंतर नागपूर विमानतळावर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या पराभवावर देखील भाष्य केले.

राणा म्हणाल्या, पाच वर्षांपूर्वी जनतेने मला अमरावतीचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी मला दिल्लीला पाठवलं होतं. परंतु, यंदा मला त्यांनी का थांबवलं, हे मला अजूनही समजू शकलेलं नाही. मात्र, हा पराभव म्हणजे शेवट नाही, गेल्या पाच वर्षांत मी प्रमाणिकपणे काम केलं आहे.

दरम्यान, यावेळी राणा (Navneet Rana) यांनी प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनाही अप्रत्यक्षपणे टोला लगावला. नवनीत राणा म्हणाल्या, काही लोक मैदान जिंकण्यासाठी निवडणूक लढवतात, तर काही लोक दुसऱ्यांचा पराभव करण्यासाठी प्रयत्न करतात.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप