भाजप आणि शिवसेना एकत्र आले तर माझ्यासारख्या माणसाला आनंद होईल – गडकरी 

 मुंबई – शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Shiv Sena leader and minister Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. ४० शिवसेना आमदार आणि इतर अपक्ष आमदारासमवेत एकनाथ शिंदे गुवाहाटीमधल्या हॉटेलमध्ये थांबले आहेत. भाजपासोबत शिवसेनेनं हातमिळवणी करून सरकार स्थापन करावं अशी अट त्यांनी पक्षाला घातली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Chief Minister Uddhav Thackeray)  हे कदापि शक्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, बंडखोर शिंदे गटाच्या व्यूव्हरचनेला निष्पभ्र करण्यासाठी तसेच शिवसेनेची पडझड रोखण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि तमाम शिवसैनिक मैदानात उतरले आहेत.या सर्व घडामोडींमुळे शिवसेनेच्या दोन गटात मोठा संघर्ष निर्माण झाला असून बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर हल्ले होत आहेत. बंडखोर आमदारांच्या विरोधात घोषणाबाजीसह पोस्टर्सला काळं फासण्याच्या घटना समोर आल्या आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर आता केंद्रीय मंत्री nitin गडकरी यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले,  अनेक वेळा शिवसेना फुटली आणि लोक पक्ष सोडत राहिले हे दुर्दैव आहे. पण हिंदुत्वावर प्रेम करणाऱ्यांना, बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या माझ्यासारख्यांना शिवसेनेचे विघटन पाहून आनंद होत नाही. त्यांना फक्त वाईट वाटते. गडकरी म्हणाले की, भाजप हा लोकशाहीवादी पक्ष आहे, हा पक्ष पिता-पुत्रांचा किंवा माता-पुत्रांचा पक्ष नाही. आमच्या पक्षाचे संविधान आहे आणि ते एकत्रितपणे ठरवले जाते. त्यानुसार ती आजपर्यंत चालू आहे आणि पुढेही चालू राहील.

शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीबाबत नितीन गडकरी म्हणाले की, शिवसेनेत लोक तुटत आहेत, याचे उत्तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच देऊ शकतील, कारण हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. पण माझा मुद्दा असा आहे की शिवसेना जेव्हा-जेव्हा फुटली तेव्हा मी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. आज परिस्थिती कशीही असो पण भाजप आणि शिवसेना एकत्र आले तर माझ्यासारख्या माणसाला आनंद होईल. पण आज ती परिस्थिती दूरच दिसते. वेळच सांगेल.असं ते म्हणाले.