आज शरद पवारच मुख्यमंत्री हवे होते असं म्हणणाऱ्या यशोमती ठाकूर यांना नीलम गोऱ्हे यांनी सुनावले खडेबोल

अमरावती – आज शरद पवारच ( Sharad Pawar ) मुख्यमंत्री हवे होते. ती काळाची गरज आहे. शरद पवार यांनी आत्तापर्यंत चारवेळा मुख्यमंत्रीपद भुषवलं आहे. मात्र महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर जर शरद पवार मुख्यमंत्री असते तर चित्र काहीसं वेगळं असतं असं वक्तव्य यशोमती ठाकूर ( Yashomati Thakur ) यांनी केलं आहे.

अमरावतीच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख विद्यापीठातील शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण आणि सभागृहाचे उद्घाटन प्रसंगी यशोमती ठाकूर यांनी शरद पवार यांचं कौतुक केलं. त्याचवेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. महाविकास आघाडी बनवण्या त्यांचा प्रमुख आत असला तरी आजच्या तारखेत ते मुख्यमंत्री असायला होते. ती आज काळाची गरज आहे असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, ठाकूर यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे उलटसुलट चर्चा सुरु झाल्या असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ठाकूर यांच्या दृष्टीने कमी पडत आहेत का असा सवाल देखील केला जात आहे. एखाद्या नेत्याचे कौतुक करणे ठीक आहे मात्र ज्या मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात त्या काम करत आहेत त्याचं काय असा देखील सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान, दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे ( Neelam Gorhe ) यांनीही यशोमती ठाकूर यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ”माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वावर आणि कार्यक्षमतेवर कोणतीही शंका नाही. मला तर वाटतं की त्यांनी UPA चं नेतृत्व करावं. तसा प्रस्ताव तुम्ही द्याल का यशोमतीताई? असा खोचक प्रश्न नीलम गोऱ्हे यांनी विचारला आहे.