Twinkle Khanna | ‘माझ्या मुलांनी पळून जाऊनच लग्न करावं’ अंबानींच्या प्री वेडिंगनंतर ट्विंकल खन्नाने मांडलं स्पष्ट मत

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ट्विंकल प्रत्येक मुद्द्यावर आपले मनमोकळेपणाने मत व्यक्त करते. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या नुकत्याच झालेल्या प्री-वेडिंग बॅशनंतर ट्विंकलने तिच्या मुलांच्या लग्नाबद्दल मोठी गोष्ट सांगितली आहे. तिने सांगितले की, तिच्या मुलांनी पळून जाऊन लग्न करावे अशी तिची इच्छा आहे.

ट्विंकल (Twinkle Khanna) म्हणाली, ‘मी माझ्या बहिणीला म्हणाले की बरं झालं आपण आपली आडनावं बदलली नाहीत. आपण खन्ना बहिणीच राहिलो. जर आपण आडनाव बदललं असतं तर पुन्हा खन्ना होण्यासाठी आपल्याला नवऱ्याकडून एनओसी घ्यावी लागली असती.’ तेवढ्यात माझी बहिण मला थांबवत म्हणाली, तू नावांबद्दल बोलत आहेस पण त्यासाठी आपल्याला काय तामझाम करावा लागला असता. अंबानींच्या इव्हेंटनंतर तर मोठं उदाहरण सेट झालं आहे.’

मी तिला उत्तर देत म्हणाले, “मी नीता भाभींसारखी नाचू शकत नाही. कोरोनावेळी मी शेवटचं तम्मा तम्मा लोगे वर नाचायचा प्रयत्न केला. पण कदाचित देवालाही माझ्या स्टेप्स फारच वाईट वाटल्या कारण मी धापकन पडले आणि माझा पायच फ्रॅक्चर झाला. तसंच मी आणि माझे पती रात्री १० नंतर कदाचितच जागे राहू शकतो. तसंच २० पेक्षा जास्त लोकांसाठी डिनर पार्टीचं आयोजन करायचं म्हणजे आम्हाला दोघांनाही टेन्शनच येतं.जर माझ्या मुलांना मला सुखात पाहायचं असेल तर त्यांनी तर सरळ पळून जाऊन लग्न करावं.”

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Sharad Pawar | ‘दहा वर्षाच्या कृषिमंत्री पदाच्या कार्यकाळात शरद पवार यांनी एकही शेतकरी हिताचे कार्य केले नाही’

Baramati Lok Sabha Elections | बारामतीमधील लढाई लक्ष्यवेधी ठरणार; अजितदादांच्या पुढच्या चालीकडे सर्वांचे लक्ष

Devendra Fadnavis | विकासपूरक धोरणामुळे २०४७ पर्यंत महाराष्ट्राची २ ट्रीलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल शक्य