१४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर आदिल खानच्या वकिलांची प्रतिक्रिया; म्हणाले, “राखीने प्लॅन करुन फसवलं..”

मुंबई- बी टाऊनची ड्रामा क्वीन राखी सावंतचा (Rakhi Sawant) पती आदिल खान दुर्रानीविरोधात (Adil Khan Durrani) तक्रार दाखल केल्यानंतर त्याला मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अभिनेत्रीच्या तक्रारीवरून मुंबईच्या ओशिवरा पोलिसांनी आदिल खानवर ही कारवाई केली होती. त्यानंतर आदिलला अंधेरी कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. आता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यावर आदिलच्या वकिलांनी त्याच्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे.

जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप 👉🏻 https://chat.whatsapp.com/D3xA3iJHF0r1kodPsu0Q4H

आदिल खानचे वकील काय म्हणाले?
‘नवभारत टाइम्स’च्या वृत्तानुसार आदिलच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, “आदिलने पैश्यांची फसवणूक केली अशी तक्रार सुरुवातीला राखीने केली. राखीच्या घरी आदिल त्याचे कपडे आणायला गेला. तेव्हा त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस तपासामध्ये आदिलने पैश्यांचा संपूर्ण हिशोब दिला आहे. शिवाय त्याने स्वतः खूप पैसे खर्च केले असल्याचे यावेळी पोलिसांना सांगितले.”

“त्यानंतर पुन्हा पोलिस ठाण्यात जाऊन राखीने मारहाणीसारखे गंभीर आरोप आदिलवर केले. पण हे सगळे आरोप खोटे आहेत. आदिल दोषी नाही. आदिलला प्लॅन करून यामध्ये फसवलं जात आहे. आदिल व राखीचं बँकमध्ये एक जॉइंट अकाऊंट आहे. व्यवसायासाठी हे दोघं त्या अकाऊंटचा वापर करतात. जेव्हा या अकाऊंटचा वापर होतो तेव्हा तीन डिजिटचा पीन नंबर राखी व आदिलच्या फोनवर येतो. अशामध्येच पैसे खर्च करण्याचा आरोप करणं मला व्यर्थ वाटतं. आम्ही पोलिसांना बँक अकाऊंटची संपूर्ण माहिती दिली आहे.” राखीने केलेले आरोप चुकीचे असल्याचे आदिलच्या वकिलांचे म्हणणे आहे.