राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेत प्रवेश केल्यानंतर आमच्यावर झालेले खोक्याचे आरोप बंद झाले – पाटील

Gulabrao Patil : राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) सत्तेत प्रवेश केल्यानंतर आमच्यावर झालेले खोक्याचे आरोप बंद झाले. नाहीतर आम्ही आयुष्यभर खोके खोके, 50 कोटी हेच एकलं असतं असं वक्तव्य राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी केलं.

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Nandurbar Agricultural Produce Market Committee) व्यापारी संकुल आणि यासह विविध संस्थांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात झालेल्या मेळाव्यात मंत्री पाटील बोलत होते.

मी पहिल्यांदा मंत्री झालो त्यावेळेस कोट शिवला होता. मात्र आता अनेकांनी कोट टांगून ठेवले असल्याचा टोला मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्यांना गुलाबराव पाटील यांनी मारला. आज झालेल्या मेळाव्यात मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या चौफेर फटकेबाजीमुळे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला.