Agnipath recruitment : अग्निपथ भरती मेळाव्यात बनावट कागदपत्रांचा वापर करणाऱ्या उमेदवारांना पकडले

चंदीगड : हिसारमधील अग्निपथ भरती (agnipath recruitment) मेळाव्यात उमेदवारांनी बनावट कागदपत्रे वापरल्याची 14 प्रकरणे समोर आली आहेत. या उमेदवारांनी बनावट प्रवेशपत्र वापरून भरती मोहिमेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचा गैरप्रकार निदर्शनास आला.

भरती रॅलीदरम्यान उमेदवारांनी बनावट कागदपत्रांचा कथित वापर केल्याची १४ प्रकरणे हिसारमध्ये नोंदवली गेली आहेत. ही प्रकरणे शुक्रवारी आढळून आली, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. भरती प्रक्रियेत काटेकोर दक्षता व पारदर्शकतेमुळे ही प्रकरणे पकडली जात असून अशा फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे या निवेदनात म्हटले आहे.

हिस्सारमध्ये अग्निपथ योजनेअंतर्गत १२ ऑगस्टपासून सुरू झालेल्या भरती मेळाव्यात मोठ्या संख्येने उमेदवार सहभागी होत आहेत.या लष्करी भरती योजनेसाठी देशभरात सुमारे २३ लाख तरुणांनी नोंदणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशभरात भारतीय लष्कराच्या एकूण 85 भरती मेळाव्या होणार आहेत. अंबाला रेंजमध्ये एकूण 8 भरती मेळावे आयोजित केले जातील, त्यापैकी एक स्वतंत्रपणे महिलांसाठी असेल. पहिल्या बॅचच्या उमेदवारांची परतीची परीक्षा १६ ऑक्टोबर रोजी घेतली जाईल. याआधी अग्निपथ योजनेच्या घोषणेनंतर देशभरात अनेक ठिकाणी त्याच्या निषेधार्थ हिंसक निदर्शने झाली होती. वास्तविक तरुणांचा अग्निपथ योजनेला विरोध होता. पण आता सैन्यात अग्निवीरची भूमिका बजावण्यासाठी हजारो लोक अग्निपथ भरती योजनेत सक्रियपणे सहभागी होत आहेत.