नशिबापेक्षा कष्ट महत्वाचे, घरात बसून काहीच मिळणार नाही, शिंदेंनी मारला ठाकरेंना टोमणा

Mumbai –  उद्धव ठाकरे हे कुणाला भेटत नाहीत असा ठपका शिंदे गटाने सुरवातीपासूनच ठेवलेला आहे. त्यामुळे घरात बसून काही मिळणार नाही, त्यासाठी कष्ट महत्वाचे असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. शिवाय मुख्यमंत्री पद हे सहाजासहजी मिळाले नसून त्यामागचे कष्टही विचारात घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले आहेत.

केवळ नशिबालाच दोष देत न बसता कष्टही तेवढेच गरजेचे आहेत. फळाची अपेक्षा न ठेवता अविरत परिश्रम केल्यास फळ हे मिळणारच आहे. असे म्हणत आपण मुख्यमंत्री पदाची आशा न बाळगता केवळ कष्टातून मिळालेले हे फळ असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. त्यामुळे घरी बसून काही मिळणार नसल्याचे म्हणत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

कुणाला माफी करणे हे दखील एवढे सोपे नाही. क्षमा करुन कोणतीही गोष्ट आत्मसाथ करता येते पण तो गुण नसेल तर काय होऊ शकते हे संपूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्याने पाहत आहे.क्षमा करण्यासाठी देखील मोठे मन लागतं असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.