अक्षर पटेल-सूर्यकुमार यादवची झुंज ठरली अपयशी; दुसऱ्या T20 सामन्यात श्रीलंकेकडून भारताचा पराभव

Ind vs SL 2nd T20

Pune – श्रीलंकेने दुसऱ्या T20 सामन्यात भारताचा 16 धावांनी पराभव करून 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. भारताकडून अक्षर पटेलने 31 चेंडूत 65 धावा केल्या तर शिवम मावी 15 चेंडूत 26 धावा करून बाद झाला. 2016 नंतर भारतावर श्रीलंकेचा हा पहिला विजय आहे.

या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताला 207 धावांचे लक्ष्य मिळाले होते. श्रीलंकेकडून कर्णधार दासुन शनाकाने 56 धावांची तुफानी खेळी केली, ज्यामुळे त्याचा संघ 200 धावांचा आकडा गाठू शकला. कुसल मेंडिस आणि चरित अस्लंका यांनीही श्रीलंकेसाठी उपयुक्त योगदान दिले. आता ७ जानेवारीला मालिका निर्णायक लढतीत उभय संघांमध्ये लढत होणार आहे.