बुमराह सोडतोय मुंबई इंडियन्सची साथ? गोलंदाजाच्या इंस्टाग्राम स्टोरीने चर्चांना उधाण

Jasprit Bumrah Instagram: वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या इन्स्टाग्राम स्टोरीने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. बुमराहची इंस्टा स्टोरी पाहिल्यानंतर चाहते वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. काही चाहते बुमराहने मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) सोडल्याचा अंदाज लावत आहेत, तर काहींच्या मते हार्दिक पांड्या (Hardik Pandya Mumbai Indians Comeback) मुंबईत परतल्याने बुमराह खूश नाही. नेमके काय आहे प्रकरण आणि बुमराहच्या इंस्टा स्टोरीने एवढा गोंधळ का निर्माण केला आहे, चला तुम्हाला समजावून सांगते..

वास्तविक, जसप्रीत बुमराहने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, “कधीकधी शांत राहणे हे सर्वोत्तम उत्तर असते.” बुमराहने ही स्टोरी पोस्ट करताच मुंबई इंडियन्सलाही अनफॉलो केले असून तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला. ट्विटरवर बरेच चाहते असा अंदाज लावत आहेत की बूम-बूम बुमराह आणि मुंबई इंडियन्समध्ये सर्व काही ठीक नाही आणि तो संघ सोडण्याची तयारी करत आहे. त्याचवेळी हार्दिक पांड्या मुंबईत परतल्याने बुमराह नाराज असल्याचे काही चाहत्यांचे म्हणणे आहे.

जसप्रीत बुमराहने आयपीएलमधील करिअरची सुरुवात मुंबई इंडियन्समधून केली आणि तेव्हापासून तो या संघाशी जोडला गेला आहे. बुमराहने आतापर्यंत मुंबईसाठी एकूण 120 सामने खेळले असून या कालावधीत त्याने एकूण 145 विकेट्स घेतल्या आहेत. मुंबईला पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्यात बुमराहने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

महत्वाच्या बातम्या-

राज्यातल्या दूषित वातावरणाला खोके सरकार जबाबदार, खोके सरकारने महाराष्ट्राचे राजकारण दूषित केले – सुळे

कर्णधार सापडला पण हार्दिकसारखा अष्टपैलू कसा सापडणार? या 5 खेळाडूंवर गुजरातची नजर असेल

आम्ही जुमलेबाज, भ्रष्ट पक्षांसारखे नाही; सुप्रिया सुळे यांचा दावा