हे तर एखाद्या शेंबड्या पोरालाही पटणार नाही; जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल 

Jayant Patil –  जळगावातील स्वाभिमानी सभेत बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी जालन्यातील लाठीमाराच्या घटनेवरून सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. तुम्हाला न विचारता पोलिस एखाद्या शांततेत चाललेल्या आंदोलनावर लाठीचार्ज करत असतील तर हे राज्यातील शेंबड्या पोरालाही पटणार नाही. असा हल्लाबोल पाटील यांनी केला अआहे.

तुम्हाला न विचारता पोलिसांनी लाठीचार्ज केला असेल तर त्यासारखी दुसरी गंभीर घटनाच नाही. पोलिसांवर आणि कायदा-सुव्यवस्था राखणाऱ्यांवर सरकारचं नियंत्रण नाही हे यावरून सिद्ध होतं. आज आपण सर्वांनी राजकारणाचा बारकाईने विचार करा. निवडणुकीत डोळसपणाने मतदान करा. महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुमच्यापुढे समर्थ पर्याय ठेवू. सर्वांनी ताकदीने सर्व विधानसभा मतदारसंघ उभारा. जळगाव जिल्ह्यात फार पडझड झालेली नाही. तुम्ही सर्व जण एकत्रितपणे जळगाव जिल्ह्यातील सर्वच सर्व आमदार आणि खासदार राष्ट्रवादीचे निवडून येतील. त्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करा, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

या सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले, महाराष्ट्रात, मराठा समाजाला मुर्ख बनवण्याचे काम सुरू आहे. मराठा समाज ओबीसीच्या माध्यमातून आरक्षण मागत आहे. मात्र, ओबीसींच्या आरक्षणांना धक्का न लावता मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण द्यावे त्यासाठी केंद्र सरकारने घटनेत दुरूस्ती करावी. सरकार त्यांच्या भावनांशी खेळत आहे असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्याः
देशात शेतकऱ्यांसमोर दुष्काळाचं मोठं संकट, चुकीच्या लोकांकडे देशाचे नेतृत्व गेलेले आहे- शरद पवार
देश व लोकशाही वाचवण्याची लढाई केवळ काँग्रेसची नाही तर आपल्या सर्वांची: नाना पटोले
राज्यातील येड्याच्या सरकारने वीज महाग केली आहे, शेतीला आठ तासही विज मिळत नाही – Nana Patole