Jitendra Awhad | ज्या माऊलीने तुम्हाला सगळं दिलं, तिचं कुंकू कधी पुसलं जाईल याची वाट बघताय?

Jitendra Awhad : अजित पवारांनी ( Ajit Pawar) बारामतीतल्या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याचे पडसाद राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये उमटत आहेत. ‘शेवटची निवडणूक आहे म्हणतील, भावुक होऊ नका. शेवटची निवडणूक कधी होणार आहे माहीत नाही,’ असं अजित पवार म्हणाले होते. अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याचा जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी समाचार घेतला आहे.

अजित पवारांनी हद्द पार केली आहे, एखाद्या माणसाच्या मृत्यूची प्रार्थना करणं हे माणुसकीला शोभणारं आहे का? याचा विचार अजित पवारांनी करावा. आपल्या काकाच्या मृत्यूची वाट बघतोय, हे राजकारण आहे का? शरद पवार अजरामर राहतील, त्यांचं योगदान अजरामर राहील, हे विसरू नका असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

ज्या कुटुंबाने तुम्हाला सगळं काही दिलं, ज्या माऊलीने तुम्हाला सगळं दिलं, तिचं कुंकू कधी पुसलं जाईल याची वाट बघताय. तुमच्यासोबत काम केल्याची लाज वाटते, आधीपण वाटतच होती. एवढं घाणेरडं राजकारण कधी बघितलं नाही,’ अशी घणाघाती टीका जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

भाजप आमदाराच्या गोळीबारामुळे आणि मुख्यमंत्र्यांवरील आरोपांमुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघे मिळून मराठा आणि ओबीसी समाजाला एकमेकांविरोधात झुंझवत आहेत – Nana Patole

Atif Aslam | “पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करून दाखवाच”, मनसेचं बॉलिवूडकरांना थेट आव्हान