‘चला त्यानिमित्ताने काँग्रेसला गोमूत्र पवित्र आहे याची जाणीव तरी झाली’

पुणे : शिवसैनिकांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की केल्यानंतर हे प्रकरण राज्यभरात चांगलेच गाजले. त्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या पालिकेच्या पायऱ्यांवर पडले होते. त्यानंतर ज्या पायऱ्यावर किरीट सोमय्या पडले होते. त्याठिकाणी भाजपातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठा राडा घातला. कॉंग्रेस या सत्काराच्या निषेधार्थ त्या पायऱ्यावर गोमूत्र आणि गुलाबपाणी टाकून भाजपच्या या स्टंटबाजीला फाटा दिला.

किरीट सोमय्यांनाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा कॉंग्रेस कडून देण्यात आला होता. त्यामुळे त्याठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. तरीही देखील किरीट सोमय्यांना विरोधात कॉंग्रेस पक्षांने मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांच्या उपस्थित घोषणाबाजी केली. कॉंग्रेसचा हा विरोध झुगारून भाजपा कडून किरीट सोमय्यांचा सत्कार करण्यात आला.

यावरून भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेसच्या या कृतीवर जोरदार प्रहार केला आहे. ‘किरीट सोमय्या यांचा ज्या पायरीवर सत्कार झाला त्या पायरीचे काँग्रेसने गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केले. त्यानिमित्ताने काँग्रेसला गोमूत्र पवित्र आहे ह्याची जाणीव झाली हे किरीट सोमय्या यांच्या लढ्याचे यश आहे. बाकी ED ची कारवाई कशानेच थांबणारी नाही’. असा घणाघात अतुल भातखळकर यांनी केला आहे.