आपला बालीशपणा अख्ख्या महाराष्ट्राला माहीत पडलेला आहे; म्हस्केंचा आदित्य ठाकरेंना टोला

ठाणे : आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन काही तारखा, आकडे जाहीर केले. याबाबत नरेश म्हस्के म्हणाले, जे प्रकल्प आहेत ते तीन साडेतीन महिन्यापूर्वीच महाराष्ट्र बाहेर गेलेले आहेत. त्याला कारणीभूत तेच आहेत, असा आरोप त्यांनी केला.

ते म्हणाले, तुम्ही कोण ? तुमचं वय किती? पक्षांमध्ये किती काम केलं तुमचं जेवढं वय आहे त्याच्यापेक्षा जास्त वर्ष या शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी काम केलं आहे.आपली योग्यता तपासावी.माजी मुख्यमंत्र्यांना बोलायला सांगा.

आपलं काम कधी पाहिले का काम कधी तपासले का आपली योग्य तपासावी. आतापर्यंत मुख्यमंत्री अद्यापही आपल्या विरुद्ध काही बोलेल नाहीयेत बाळासाहेबांच्या संस्कृतीमध्ये ते वाढलेले आहेत आणि बाळासाहेबांच्या संस्कृती प्रमाणे वागतात.

आपण फक्त वारसा घेतलेला आहे. ती संस्कृती अंगीकारली नाहीये त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे बोलताय. खोके खोके काय बोलताय लागले कॅग चौकशी बारा हजार करोड रुपये तुम्ही जे काही मुंबई महापालिकेत केले ना घटनाबाह्य नियमबाह्य कळेल जनतेला आपण खोके कुठे लपवून ठेवले.

चिंता करू नका या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम बनवण्याचे काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री करणार आहेत.आदित्य साहेब आता तुम्हाला साहेब म्हणायला नको पण आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या संस्कृतीमध्ये वाढलेला आहोत म्हणून आम्ही तुम्हाला बोलतोय आपली योग्यता तपासा आणि नंतरच मुख्यमंत्र्यांवरती आरोप करा.आपला बालीशपणा अख्ख्या महाराष्ट्राला माहीत पडलेला आहे. आपण किती बालीश आहात ते, असंही म्हस्के यांनी ठणकावून सांगितलं.