कॅमेरा लागला की हे…!”; राज ठाकरेंनी उडवली संजय राऊत यांची खिल्ली

पुणे – गेल्या काही दिवसांपासून खासदार संजय राऊत भाजपवर टीका करण्यासाठी पत्रकार परिषदा घेत आहेत. त्यावर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी भाष्य करत चांगलाच समाचार घेतला आहे. संजय राऊतांची नक्कल करत राज ठाकरेंनी त्यांच्यावर खोचक शब्दांत निशाणा साधला. डोळे, भुवया उडवून बोलणं… बोलणं हा प्रश्न नाही. आपण किती बोलतो? आपण काय बोलतो? कसं बोलतो? हा प्रश्न आहे. असं ठाकरे म्हणाले.

मनसेने आज आपला 16 वा वर्धापनदिन साजरा केला. मनसे पहिल्यांदाच मुंबईबाहेर म्हणजे पु्ण्यामध्ये वर्धापनदिन साजरा केला. यावेळी भाषण करताना राऊत यांची नक्कल करत राज ठाकरे यांनी त्यांची चांगलीच खिल्ली उडवली. संजय राऊत किती बोलतात, काय बोलतात, सगळ्याची एक अॅक्शन असते. चॅनेल लागलं तर हे सुरू, चॅनेल हटलं तर हे बंद. मग नंतर यांचं पुन्हा कसं काय सुरू, काय चाललंय अशी संजय राऊतांची खिल्ली राज ठाकरे उडवली आहे.राज ठाकरे म्हणाले की, "चॅनेल लागलं तर हे सुरू, चॅनेल हटलं तर हे बंद. मग नंतर यांचं पुन्हा कसं काय सुरू, काय चाललंय. भविष्यातील महाराष्ट्रातील पिढ्या या पाहतायत, ते काय शिकतील? यांना फक्त निवडणुकीचं पडलं आहे.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, सत्ताधारी म्हणतात आम्हाला संपवायला निघाले आहेत, विरोधी पक्ष म्हणतात आम्हाला संपवायला निघालेत. टीव्हीवर शिव्या सुरू आहेत, हेच राजकारण वरती असेल तर ग्रामपंचायतीमध्ये काय सुरू असेल. महाराष्ट्रातील लोक यांना वैतागले आहेत. त्यामुळे त्यांना काही अडचणी आल्या तर ते सरकारकडे न जाता आपल्याकडे येतात हे आपलं यश आहे.