तब्बल 15 दिवसांनी राजू श्रीवास्तव शुद्धीवर आले, त्यांनी शुद्धीवर येताच म्हणाले …

नवी दिल्ली – कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराच्या झटक्याने दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. यादरम्यान संपूर्ण देश त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होता. चाहत्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या, राजू श्रीवास्तव पुन्हा शुद्धीवर आले आहेत. राजू श्रीवास्तव यांना सुमारे 15 दिवसांनी शुद्धी आली. एवढेच नाही तर कॉमेडियनच्या प्रकृतीतही सातत्याने सुधारणा होत आहे. राजू श्रीवास्तव 10 ऑगस्ट रोजी दिल्लीतील जिममध्ये वर्कआउट करत होते. याच दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. (raju-srivastava-health-update)

एएनआयच्या वृत्तानुसार, राजू श्रीवास्तव यांचे पर्सनल सेक्रेटरी गरवीत नारंग यांनी सांगितले की, एम्सचे डॉक्टर राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. विशेष म्हणजे, राजू श्रीवास्तव यांचे कुटुंबीय त्यांच्या चाहत्यांना कोणत्याही प्रकारच्या अफवांकडे लक्ष देऊ नका असे आवाहन करत होते. कुटुंबाने कॉमेडियनच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून पोस्ट केले आणि लिहिले, ‘राजू श्रीवास्तवजींची प्रकृती स्थिर आहे. अफवांकडे दुर्लक्ष करा. त्याच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत राहा.

शुद्धीवर आल्यावर लगेच त्यांनी त्यांच्या पत्नीसोबत संवाद साधला. त्यांनी त्यांच्या कानात ‘मी ठिक आहे’, असे म्हंटले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांचा आनंद गगणात मावेना आणि चाहत्यांचा देखील. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती ठिक आहे. त्यांना सर्व काही आठवत असून त्यांनी आपण कोण आहोत, कोठे आहोत, असे प्रश्न विचारले असता, त्यांनी त्यांची सर्व उत्तरे दिली.

राजू श्रीवास्तव यांचे सचिव गरवीत नारंग यांनी सांगितले होते की त्यांना 15 दिवसांनी शुद्धी आली आहे. 10 ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव यांना व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून त्यांच्या तब्येतीत सतत चढ-उतार होत आहेत. राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, तो लढवय्या असून बरा होऊन लवकरच परत येईल. राजू श्रीवास्तव यांच्या आरोग्यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत.