कामाच्या वेळी 18-18 तास  झोपा काढल्या अन् आता जीवाचे रान करुन काय उपयोग?

नागपूर – मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांच्याकडे काम करण्याची चांगली संधी होती. त्या दरम्यान मात्र, त्यांनी 18-18 तास झोपा काढल्या आणि आता हातातून सर्वकाही निघून गेल्यावर राज्यभर दौरे करायचे काय कामाचे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(BJP state president Chandrasekhar Bawankule)  यांनी केली आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरे हे पक्ष संघटन आणि कार्यकर्त्यांच्या बैठकांसाठी नागपुरात दाखल झाले आहेत. शिवाय ते आपण मंत्री असताना ज्या भागात कामे केली तिथेही भेटी देत आहेत. तान्हा पोळ्याला त्यांच्या उपस्थितीवरुन त्यांना हिणवले गेले असले तरी नागपुरात त्यांचे स्वागत आहे असे बावनकुळे यांनी सांगितले. नागपूर हे भाजपाचे राजकीय केंद्रबिंदू आहे. या नागपूर विभागात आदित्य ठाकरे यांचा दौरा होत असून त्यांच्यावर खोचक टीकाही केली जात आहे.