पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करुन जनतेला दिलासा द्या; काँग्रेस नेत्याचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई – केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई प्रचंड वाढली असून सामान्य जनतेला या महागाईने जगणे मुश्कील झाले आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सर्वच सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. पंजाब व राजस्थान सरकारने ज्या पद्धतीने पेट्रोल डिझेलच्या करामध्ये कपात करून जनतेला दिलासा दिला त्याचपद्धतीने आपल्या राज्यातील जनतेच्या हितासासाठी पेट्रोल डिझेलवरील कर कमी करून दिलासा द्यावी, अशी मागणी माजी मंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नसीम खान म्हणतात, केंद्र सरकारने मागील सात वर्षात पेट्रोल-डिझेलचे दर वाढवून १०० रुपये प्रति लिटर रुपयांच्यावर गेले आहेत. एलपीजी गॅसही ९०० रुपये झाला आहे. मोदी सरकारने सातत्याने केलेल्या दरवाढीमुळे सामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या महागाईमुळे वाहतुकीचा खर्च वाढून इतर वस्तुंच्या किमती वाढतात, प्रवासाचा खर्चही वाढतो. कोरोनामुळे आधीच लोकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला असून त्यांच्यासमोर अनेक समस्या उभ्या ठाकलेल्या आहेत. या दुष्टचक्रात सामान्य जनता भरडली जात असून त्यांचे जगणे कठीण झाले आहे.

पेट्रोल डिझेलवरील कररुपाने राज्याला मिळणारा पैसा केंद्र सरकार वेळेवर देत नाही, त्यातच सेसच्या पैशातील हिस्सा राज्यांना मिळतच नाही तो फक्त केंद्र सरकारलाच मिळतो. यातून राज्याची आर्थिक कोंडी होत आहे परंतु जनतेला दिलासा देणे आपले कर्तव्य आहे. राज्यातील जनतेच्या हितासासाठी महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून आपण पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करून दिलासा द्यावा, असे नसीम खान म्हणाले.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post
Congress

प्रदेश काँग्रेस सोशल मीडिया विभाग राज्य अध्यक्षपदी विशाल मुत्तेमवार यांची नियुक्ती

Next Post

ग्रामपंचायत पोट निवडणूकीचा कार्यक्रम अखेर जाहीर

Related Posts
thackeray - शिंदे

ठाकरे गटाचे 8 जिल्हाप्रमुख आणि काँग्रेसचे माजी आमदार बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार ?

मुंबई – शिवसेनेचे विदर्भातील जिल्हाप्रमुख ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करून शिंदे गटात येणार आहेत. शिंदे गटाचे खासदार कृपाल…
Read More
ncp

 खळबळजनक : राष्ट्रवादीच्या ‘या’ धडाडीच्या तरुण नेत्याविरोधात ४२० चा गुन्हा दाखल

पंढरपूर : पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) नेते भगीरथ भालके (Bhagirath Bhalke)…
Read More
उध्वस्त ठाकरेंची अवस्था घरात नाही दाणा पण मला हवालदार म्हणा अशी झाली आहे- ज्योती वाघमारे 

उध्वस्त ठाकरेंची अवस्था घरात नाही दाणा पण मला हवालदार म्हणा अशी झाली आहे- ज्योती वाघमारे 

सोलापूर – कर्नाटक मध्ये सिद्धरामय्या सरकारचा शपथविधी पार पाडला. झाडून सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण होतं पण काँग्रेसने…
Read More