शिवसेना संपवण्याचा भाजपाचा डाव कधीपासून होता हे आता जनतेसमोर उघडं पडत आहे- रुपाली पाटील 

Pune  – अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri East Bypoll 2022) उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस उरले असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यात ही निवडणूक भाजपऐवजी (BJP) शिंदे गट (CM Eknath Shinde) लढण्याची शक्यता आहे. यातच दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप देखील होत आहेत.

यातच आता मनसेतून राष्ट्रवादीत दाखल झालेल्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी भाजपला लक्ष्य केले आहे. त्या म्हणतात, शिवसेना भाजपा युती असताना मुरजी पटेल हा अपक्ष निवडणूक लढला. मुरजी पटेल हा त्यावेळी शिवसेनेचा उमेदवार पराभूत करण्यासाठी कुणी उभा केला होता, हे लोकांना समजल आहे. शिवसेना संपवण्याचा भाजपाचा डाव कधीपासून होता हे आता जनतेसमोर उघड पडत आहे, असं पाटील यांनी म्हटलं आहे.