शिवसेना आता बाळासाहेबांची शिवसेना नसून बकरीसेना झाली आहे – राणे

मालवण – शिवसेना आणि राणे कुटुंबातील संघर्ष सर्वश्रुत आहे. राणे कुटुंबीय शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसून येत असताना आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचले आहे.

मालवण देवबाग येथील बंधाऱ्याचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नारायण राणे ( NARAYAN RANE ) यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेसह उद्धव ठाकरेंवर ( UDDHAV THACKAREY ) टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे बोलतो काय? करतो काय? आताची शिवसेना ( SHIVSENA ) ही बाळासाहेंबाची ( BALASAHEB THACKAREY ) शिवसेना राहिली नाही अशी टीका त्यांनी केलीय.

महाराष्ट्रात ज्याची सत्ता आहे त्याचे आमदार किती तर ५४ आणि आता पंतप्रधान पदाची स्वप्ने पहात आहे. केंद्रात सत्ता मिळविण्यासाठी किती खासदार निवडून यावे लागतात हे तरी यांना माहित आहे का? असा सवाल करतानाच शिवसेना पूर्वी म्याव म्याव करायची. पण आता ती बाळासाहेबांची शिवसेना राहिली नसून ब्या करणारी बकरीसेना राहिली आहे असा शाब्दिक हल्ला राणे चढवला.