Shivajirao Adhalarao Patil | अमोल कोल्हे फक्त बोलण्यातच पटाईत, आढळराव पाटलांची टीका

Shivajirao Adhalarao Patil | लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्याचा प्रचार रविवारी थंडावला. आता चौथ्या टप्यात असलेल्या शिरूर लोकसभा (Shirur LokSabha) मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचाराने वेग घेतला आहे.  महाविकास आघाडीचे उमेदवार  ‘डॉ. अमोल कोल्हे फक्त बोलण्यातच पटाईत आहेत,’ अशी टीका शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली आहे.

लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे आयोजित स्नेह मेळाव्यात ते बोलत होते. या प्रसंगी शरद सहकारी बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, विष्णु हिंगे, कल्पना आढळराव, अरुण गिरे, सुनील बाणखेले यांच्यासह महायुती मधील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवाजीराव आढळराव पाटील ( Shivajirao Adhalarao Patil) म्हणाले,  ‘आपल्या वाकचातुर्याने लोकांवर भुरळ पाडून फक्त धादांत खोटे बोलून काहीही संबंध नसलेले आरोप करण्याची काहींची प्रवृत्ती आहे. ‘पुणे-नाशिक महामार्गावर खेडपासून आळेफाट्यापर्यंत सहाही बायपास केल्याचे श्रेय घेण्याचे काम विद्यमान खासदारांनी केले; परंतु त्यानंतर संबंधित खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी याकामाचा पाठपुरावा मी केल्याचे सांगितल्याचे सर्वश्रुत झाल्यानंतर या विषयावर त्यांनी बोलणे बंद केले,’ अशा शब्दांत आढळराव यांनी कोल्हेंवर टीका केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Baramati Loksabha | पाणी प्रश्नावरून अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात चांगलीच खडाजंगी

Chandrakant Patil | पराभव समोर दिसत असल्याने संविधान बदलण्याची भाषा! चंद्रकांत पाटील यांचा कॉंग्रेसवर जोरदार प्रहार

Muralidhar Mohol | सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी मेट्रोचा विस्तार करणार