‘कधी आयुष्यात निराशा दाटून आली, तर राउतांकडे पहा; आभाळाला गवसणी घालण्याची उर्मी निर्माण नाही झाली तर विचारा’

मुंबई – ५ राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आता समोर आले असून पंजाब वगळता ४ राज्यात भाजपा सरकार स्थापन करणार असल्याचे चित्र आहे. भाजप आप आणि समाजवादी पार्टी वगळता कोणत्याही पक्षाला या निवडणुकीत समाधानकारक कामगिरी करता आलेली नसल्याचे दिसून येत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांची तर खूपच बिकट अवस्था असून नोटा पेक्षा देखील कमी मते या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना मिळाली आहेत.

दरम्यान, उत्तर प्रदेशात मंत्री आणि गोव्यात सरकार स्थापन करण्याच्या शिवसेनेचा दावा आता किती हास्यास्पद होता हे देखील समोर आले आहे. सोशल मिडीयावर आता सेनेची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. सेनेप्रमानेच राष्ट्रवादीची देखील अवस्था असून खासदार शरद पवार यांना देखील ट्रोल केले जाऊ लागले आहे.

भाजप नेते शिवराय कुळकर्णी यांनी याच मुद्यावरून शिवसेनेची आणि खासदार संजय राऊत यांची चांगलीच खिल्ली उडवली आहे. ते आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, कधी आयुष्यात निराशा दाटून आली, न्यूनगंड निर्माण झाला तर संजय राउताकडे पहा, आभाळाला गवसणी घालण्याची उर्मी निर्माण नाही झाली तर विचारा !! अरे जो सेनेचा उमेदवार युपीमधील पहिला मंत्री होणार होता त्याला तब्बल 22 मत आहेत असं म्हणत त्यांनी सेनेची खिल्ली उडवली आहे.