राज्यात पुन्हा निवडणुकीचे वारे वाहणार; राज्य निवडणूक आयोगाने केली मोठी घोषणा

मुंबई – राज्य निवडणूक आयोगाने (Maharashtra Election Commission) आज मोठी घोषणा केली आहे. राज्यातील पालघर (Palghar), धुळे (Dhule), नंदुरबार (Nandurbar), वाशीम (Washim), नागपूर (Nagpur) आणि अकोला (Akola) जिल्हा परिषदेतील 2 निवडणूक विभागांच्या आणि पंचायत समितीतील 6 निर्वाचक गणांच्या रिक्तपदांसाठी पोटनिवडणुकीचा घोषणा करण्यात आली आहे.

ही पोटनिवडणूक 5 जून आणि 6 जून या दरम्यान होईल. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, 5 जूनला मतदान होईल तर 6 जूनला मतमोजणी केली जाईल.राज्य निवडणूक आयोगाने याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करत माहिती दिली आहे. पालघर, धुळे, नंदुरबार, वाशीम, नागपूर आणि अकोला जिल्हा परिषदेतील 2 निवडणूक विभागांच्या आणि पंचायत समितीतील 6 निर्वाचक गणांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 जून 2022 रोजी मतदान होणार आहे. तर 6 जून 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली.