“लोकशाही बसली धाब्यावर! हुकुमशाहीचा उदय की…”, संसदेतून १४१ खासदारांचं निलंब; तेजस्विनी पंडित संतापली

Tejaswini Pandit : संसदेच्या सुरक्षितता भंग प्रकरणी (Parliament Attack) मंगळवारी पुन्हा दोन्ही सदनांमध्ये विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ सुरूच ठेवल्यानं लोकसभेतील 49 खासदारांना निलंबित करण्यात आलं. त्यापूर्वी सोमवारी दोन्ही सदनांमधील मिळून 78 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

काल संसद सुरक्षितता भंग प्रकरण आणि त्याचबरोबर या 78 खासदारांवर झालेल्या निलंबन प्रकरणावरूनही उर्वरित सदस्यांनी सदनामध्ये गदारोळ सुरूच ठेवला. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी पंतप्रधानांची विपर्यस्त स्वरूपातील छायाचित्रे असलेली पत्रकं ठिकठिकाणी लावल्यावरून संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान 141 खासदारांच्या निलंबन प्रकरणावर मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने एक पोस्ट केली आहे.

तेजस्विनीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये खासदारांच्या निलबंनाचा व्हिडिओ शेअर करत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “चला बिलं पास करून घ्या पटापट, मेजॉरिटी तर आधीपासून होतीच आता तर विरोध करायला कुणी नाही…!! लोकशाही बसली धाब्यावर!!! हुकुमशाहीचा उदय की अंताकडे प्रवास??” असं तेजस्विनीने पोस्टमध्ये म्हटलं आहे. तेजस्विनीच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात श्रीराम अक्षता कलशाचे पूजन; पुणेकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती

Sunrisers Hyderabad Full Squad: सनरायझर्स हैदराबाद पूर्ण संघ,यंदा पॅट कमिन्सपासून हे खेळाडू संघाचा भाग बनले