किमान आदित्य यांनी भरवलेल्या फ्रँकीची आणि अन्नाची तरी किंमत ठेवायची होती; खा. राऊत यांची सामंतांवर टीका

Vinayak Raut

Mumbai – राज्यात शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर आता राज्यात सत्तांतर झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बंडखोर आमदार, अपक्ष आमदार आणि भाजपच्या मदतीने नवे सरकार स्थापन केले आहे. दरम्यान, या बंडाच्या भूकंपाचे अजूनही धक्के शिवसेनेला बसत असून अनेक नेते आता शिंदे गटात सामील होत आहेत.

यातच आता शिवसेनेचे सरचिटणीस, खासदार विनायक राऊत (Vinayak Raut)यांनी बंडखोर आमदार उदय सामंत (Uday Samant)  यांच्यावर टीका केली आहे. सात वर्षातलं तुमचं शिवसेनेतील आयुष्य, चार वर्षांत तुम्हाला म्हाडाचं मंत्रीपद दिलं. खोऱ्याने ओढलं, फावड्याने ओढलं, त्यांनी कधी विचारलं नाही, असा टोलाही विनायक राऊत यांनी लगावला. आदित्य ठाकरे यांनी उदय सामंत यांना सर्वात जास्त जवळ केले. किमान आदित्य यांनी भरवलेल्या फ्रँकीची आणि अन्नाची तरी किंमत ठेवायची होती, अशी टीका विनायक राऊत यांनी केली.

प्रत्येक बंडखोर आमदाराने 50 ते 60 खोके घेतले, शिवसेना संपवण्याचे भागीदार झाल्यास तुमची जागा नरकात असेल. तुमच्या जाण्याची आम्हाला किंमत नाही. पण यापुढे कोणत्याही गद्दाराला शिवसेनेमध्ये प्रवेश मिळणार नाही, असे म्हणत राऊतांनी उदय सामतांना खडसावले.

Previous Post
Sanjay Raut

शरद पवारांचा औरंगाबादच्या नामांतराला विरोध नाही; संजय राऊत यांची सारवासारव

Next Post
Bharat Gogawale

… तेव्हा लाज वाटली नव्हती का ? भरतशेठ गोगावले यांचा ‘शालजोडी’तला सवाल

Related Posts
Jitendra Awad | मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद निर्माण करून वेगळं करण्याचा सरकारचा डाव, जितेंद्र आव्हाड यांचा हल्लाबोल

Jitendra Awhad | मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद निर्माण करून वेगळं करण्याचा सरकारचा डाव, जितेंद्र आव्हाड यांचा हल्लाबोल

 Jitendra Awhad : विद्यमान सरकारकडून ज्या प्रकारे हिंदू आणि मुस्लिम या दोन समाजांमध्ये ज्या प्रमाणात वाद निर्माण करून…
Read More
Nitesh Rane | अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री फडणवीसांबरोबर खुल्या चर्चेला या; नितेश राणेंचे उबाठा, राऊत यांना आव्हान

Nitesh Rane | अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री फडणवीसांबरोबर खुल्या चर्चेला या; नितेश राणेंचे उबाठा, राऊत यांना आव्हान

Nitesh Rane | केंद्रातील एनडीए सरकारच्या विकसित भारताची पायाभरणी करणा-या अर्थसंकल्पाचे देशाच्या कानाकोप-यातून कौतुक होत असताना अर्थसंकल्पाबाबत काहीही…
Read More
shashi tharoor

चिंतन शिबिरात सौहार्दपूर्ण तोडगा निघाला; शशी थरूर यांचे फोटो पुन्हा चर्चेत  

उदयपुर – राजस्थानमधील उदयपूरमध्ये (Udaipur) तीन दिवसीय काँग्रेस चिंतन शिबीर (Chintan Shibir) सुरू आहे.आज चिंतन शिबिराचा शेवटचा दिवस.…
Read More