आमच्यावर किती ही हल्ले झाले तरी आम्ही शांत बसणार नाही; वैशाली नागवडे भाजपवर बरसल्या 

पुणे – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Union Minister Smriti Irani) यांच्या पुण्यातील कार्यक्रमामध्ये मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. स्मृती इराणी यांच्या बालगंधर्व रंगमंदिरातील (Balgandharva Theater) कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे (NCP leader Vaishali Nagwade) यांना मारहाण करण्यात आली असा आरोप होत आहे.

दरम्यान, आता मारहाण  केल्याचा आरोप असणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांविरोधात (Against BJP) गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांवर डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Stataion) मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल (Filed a crime) करण्यात आला आहे. स्मृती इराणी प्रमुख पाहुण्या असलेल्या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केल्याने सभागृहामध्ये अभूतपूर्व गोंधळ झाला. यामध्येच राष्ट्रवादीच्या माहिलांना भाजपा कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादीने केलाय.

दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर चौकात महाविकास आघाडीकडून मुक आंदोलन (Silent movement) करण्यात आले. या मूक आंदोलनात वैशाली नागवडे देखील सहभागी झाल्या होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, आम्ही स्मृती इराणी यांना बालगंधर्व रंगमंदिर येथील कार्यक्रमात निवेदन देण्यासाठी गेलो होतो. सध्या जी महागाई (Inflation) होत आहे.त्याबाबत त्यांना आठवण करून देण्यासाठी गेलो होतो.पण आम्हाला पोलिस बाहेर घेऊन येत असताना, माझ्यावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हल्ला (Attack) केला.त्या घटनेचा मी निषेध व्यक्त करीत आहे.या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक करावी”. या हल्ल्यामधून भाजपची मानसिकता दिसत आहे, आमच्यावर किती ही हल्ले झाले तरी आम्ही शांत बसणार नसून महागाई विरोधात सतत आवाज उठवणार असल्याचे नागवडे यांनी सांगितले.