नेहरुंच्या वारसदारांना त्यांचं आडनाव लावण्यास लाज का वाटते ? मोदींचे थेट खटक्यावर बोट

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi)  राज्यसभेत बोलताना विरोधकांवर सडकून टीका केली. गांधी कुटुंबावर हल्लाबोल केला. याच दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी नेहरूंचं आडनाव लावायला लाज वाटते का,भीती वाटते का ? असा प्रश्न राहुल गांधींना (Rahul Gandhi) विचारला आहे.

नेमकं काय म्हणाले मोदी ?

“ जवळपास ६०० सरकारी योजनांना गांधी-नेहरू परिवारातील सदस्यांचे नाव दिले गेले आहे. कोणत्याही कार्यक्रमात पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावाचा उल्लेख झाला नाहीतर काहींच्या डोक्यावरील केस उभं राहतात. आमच्याकडून कधीतरी चुकून नाव राहिलं गेलं असेल. ते आम्ही ठीक करु शकतो. कारण, ते देशाचे पहिले पंतप्रधान होते. मात्र, त्यांच्या वारसातील कोणत्याही व्यक्तीला नेहरूंचं आडनाव लावण्यास का भिती वाटते. का नेहरुंचं आडनाव लावण्यास लाज वाटते.”